Posts

Showing posts from January, 2019

अपडेट्स मिळवा...

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 7588079124 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

हात्तिच्या, गांधी मरतच नाहीत !

Image
आजपर्यंत इतिहासात अनेक क्रूर घटना घडल्या. त्याविषयी वाचलं, ऐकलं की, संवेदनशील लोक हळळतात. मात्र, त्या घटनांचं मूळ आपण शोधत नाही. विचार केल्यावर आपल्या लक्षात येईल की; ह्या ज्या क्रूर घटना घडल्या याच्या मुळाशी धर्म होता. स्वातंत्र्या नंतर देशातील पहिली क्रूर घटना कोणती असेल तर ती म्हणजे, राष्ट्रपित्याची हत्या. महात्मा गांधींनी जगाला सत्य, अहिंसेची शिकवण दिली, त्याच गांधीजींची हत्या झाली. धर्मरक्षक, देशभक्त म्हणून मिरवणाऱ्या हिंदुत्ववादी नथराम गोडसे याने गांधीजींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. आता संघ परिवारातील लोकं नथुरामचं समर्थन करण्यासाठी सांगत असतात की, गांधी मुस्लिमधार्जिणे होते, त्यांनी फाळणी करून ५५ कोटी रुपये पाकिस्तानला दिले. म्हणून नथुरामने गांधीजींची हत्या केली. नथुराम खरे राष्ट्रभक्त होते. मात्र, माझ्यासारख्या सामान्य अक्कल असणाऱ्या माणसाला प्रश्न पडतो की, नथुराम देशभक्त होते तर त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले? कधी ब्रिटिश सरकार च्या विरोधात काही रोखठोक भूमिका घेतली का?असे अनेक प्रश्न आहेत मनात. आणि त्याची उत्तर ह्या तथाकथित धर्मरक्षकांकडे नाहीत, हे ठ...

नवं क्षितिज !

Image
माणसाचा एकूण इतिहास हा शोषणाचा इतिहास आहे. कायम कोणीतरी कोणाचं शोषण करत आलेला आहे. ज्याला आपण इतिहास म्हणतो, ती आपली संस्कृती असते आणि आपली संस्कृती ही शोषणाची संस्कृती आहे. खरंतर समाज हा आपल्या संस्कृतीचं प्रतिनिधीत्वं करत असतो. या समाजात ज्या काही रचना आपल्याला दिसून येतात, त्याच्या मुळाशी शोषण आहे हे काही बुद्धिवादी लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या रचनांना छेद देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ही शोषण संस्कृतीची पाळंमुळं उखडता आली नाहीत, हे आपलं दुर्दैव ! आपल्या घटनेत समता या तत्वाचा उल्लेख आहे. हो हो, केवळ उल्लेख ! खरंतर शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा, म्हणून घटनाकारांनी हे तत्व घटनेत नमूद केलं. मात्र, आपल्या स्वार्थी राजकारण्यामुळे घटनाकारांचं हे स्वप्न पूर्णत्वास आलं नाही. आपल्या समाजिक रचना ह्या प्रचंड  विषमतावादी असून त्यातून कायम एक वर्ग दुसऱ्या कुठल्यातरी वर्गाचं कायम शोषण करत असतो. महत्वाचं असं की, ही सामाजिक विषमता मानवनिर्मित सांस्कृतिक गोष्ट आहे हे आपण ध्यानातचं घेत नाही. काही लोकं या विषमतेचे समर्थन करण्यासाठी म्हणतात की, निसर्गातच विषमता आहे आणि माणूस हा ...

प्रतिक्रियांचे स्वागत

'अवताल भवताल' या ब्लॉगवर प्रकाशित झालेली मते ही लेखिकेची स्वतंत्र मते असून आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक आहोत. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.


ईमेल– kabirbobade09@gmail.com